नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. सरकारने नव्याने पारित केलेले कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. दरम्यान, पंतप्रधानांच्या या निर्णयावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चिमटा काढत निर्णयाचे स्वागत केले आहे.
शेतकऱ्यांनी दीघर्काळ दाखवलेल्या एकजुटीचा हा विजय असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच आगामी उत्तर प्रदेशातील आणि पंजाब मधील निवडणुकीचा धसका घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे. हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताची असून पंतप्रधानाने मी आभार मानतो असे म्हणत केंद्र सरकारवर टीका करत “देर आए दुरुस्त आए…”असे म्हटले आहे.