वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथील युनिक रेसिडेन्सी (फुल मळा रोड) ते कापुरी विहीर पर्यंत ड्रेनेज लाईन करणे या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने एक कोटी 24 लाख 36 हजार 221 रुपये अंदाज पत्रक तयार करण्यात आले असून या कामांबाबत सुप्रीम कोर्ट पुणे जिल्हा परिषद यांनी घालून दिलेल्या अटी प्रमाणे शेतकरी संमती देण्यास तयार असून वाघोलीतील वार्ड क्रमांक 4 व 5 मधील सांडपाण्याचा प्रश्न त्याद्वारे सोडवला जाऊ शकतो मात्र यासाठी ग्रामपंचायतीने सांडपाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमता एस टी पी प्लांटची उभारणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याची माहिती वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी दिली.
31/8/ 2020 रोजी ग्रामपंचायत वाघोली यांच्या मासिक सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार युनिक रेसिडेन्सी ( फुल मळा रोड) ते कापूर विहिरीपर्यंत ड्रेनेज लाईन करणे यासंदर्भात दिनांक 22 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वसुंधरा उबाळे, ग्राम विकास अधिकारी अनिल कुंभार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची सभा बोलावली होती या सभेत वाघोलीतील वार्ड क्रमांक 4 व 5 मधील सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेतून संमती देण्याचे तयारी दर्शवली आहे. मात्र याच वार्डात ग्रामपंचायतीच्या वतीने सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करणे कायद्यानुसार बंधनकारक असल्याचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले. त्यानुसार एस टी पी प्लांट ची उभारणी केल्यानंतर सांडपाण्याच्या प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाने सोडवावा असा निर्णय शेतकरी व ग्रामपंचायत यांच्या मध्ये झाला.
सभेसाठी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी उपसरपंच मारुती गाडे, ग्रामपंचायत सदस्य कविता दळवी, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे,माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, शांताराम कटके, सुनील जाधवराव, अनिल सातव, प्रसाद सातव, सुधीर दळवी,चिराग सातव पाटील,गणेश सातव पाटील, दीपक सातव पाटील, माजी उपसरपंच समीर भाडळे, विठ्ठल शिवरकर, सुनील शिवरकर, नवनाथ शिवरकर, भालचंद्र शिवरकर,उत्तम शिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्यांच्या अनुपस्थिती ने शेतकरी नाराज
वाघोली तालुका हवेली येथील वार्ड क्रमांक चार व पाच मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने बोलविल्या सभेला ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भगवान वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता अनिल सातव, ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सुभाष सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अर्चना शांताराम कटके या गैरहजर होत्या.शेतकरी सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही होते मात्र सदस्यांच्या गैरहजेरी ने शेतकरी नाराज झाले.