मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे.यातच केंद्राकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह अभिनेत्री कंगना राणौत आज चंदीगड एअरपोर्टहून मुंबईला येणार आहे.
Himachal Pradesh: Actor Kangana Ranaut leaves from Bhanwla village in Mandi District for Chandigarh.
From Chandigarh, she will be leaving for Mumbai. pic.twitter.com/un6YrNvbnG
— ANI (@ANI) September 9, 2020
मिळलेल्या माहितीनुसार, चंढिगडहून मुंबईसाठी कंगना दुपारी १२.३० वाजता रवाना होईल. सध्या ती हिमाचल प्रदेशातील मंडी येथील तिच्या घरी आहे. मंगळवारी कंगना तिच्या मूळगावी पोहचली त्याठिकाणी तिच्या चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केली होती. तिच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे.