मुंबई – उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. याच संदर्भात सध्या राजकीय वर्तुळ चर्चा सुरु झाली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची भूमिका मांडली होती. याच मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी वृत्त वाहिनीशी केलेल्या संवादात म्हणाले,’उद्धव ठाकरे, यांना विनंती… खुदा होऊ नका. करोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडावर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका” असा सल्ला आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला.