मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ने आत्महत्या केल्याला एक महिन्याहून अधिक काळ झाला. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्स च्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय.
Everyone experiences harassment and bullying in this industry especially when you act autonomous and become totally independenthttps://t.co/izNxflans2
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 25, 2020
अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे. अश्यातच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री ‘कंगना राणावत’ने हिंदी सिनेसृष्टीवर अनेक गंभीर आरोप केले.
दरम्यान, कंगनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अनेक कलाकारांनी तिचा विरोध देखील केला. अशातच ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान यांनी धक्कादायक खुलासा केला. इंडस्ट्रीमध्ये आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, असा आरोप रेहमान यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगना रणौतने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने नुकताच एक ट्विट केले आहे. ‘प्रत्येकाला इंडस्ट्रीमध्ये हा अनुभव येतो. खासकरुन जेव्हा तुम्ही एकटे आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून राहण्याचा प्रयत्न करता’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तिच्या या ट्विटला अनेकांनी पाठींबा दिला आहे.