नवी दिल्ली : करोनाच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. कारण मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
India sees highest single-day spike of 15,413 COVID-19 cases, tally crosses 4 lakh
Read @ANI Story | https://t.co/WIxxewsmbw pic.twitter.com/KZNHYDtH3l
— ANI Digital (@ani_digital) June 21, 2020
देशात सद्यस्थितीस ४ लाख १० हजार ४६१ करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ६९ हजार ४५१ जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले २ लाख २७ हजार ७५६ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३ हजार २५४ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात काल ३८७४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. २४ तासांमध्ये १६० रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर कालपर्यंत राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार २०५ पोहचली होती.. राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४ टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ४.६७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात सध्या ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन अशी देखील माहिती मिळालेली आहे.