बेल्हे (वार्ताहर):- राजुरी (ता.जुन्नर) येथील रवी औटी या शेतकऱ्यांच्या पावणे तीन एकर शेतातील सगळी केळी जमीदोस्त झाली आहे.यामुळे औटी यांच केळी व इतर पिकाच मिळून सुमारे १० लाख रुपयांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यांमुळे या शेतकऱ्यावर प्रचंड मोठ संकट कोसळलं आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.
केळीबरोबरच तालुक्यातील अनेक फळबागांचं नुकसान झालं आहे. काहीच दिवसात हे सगळे फल बाजारात विकण्यासाठी तयार झाली असती. कारण आतापर्यंत लाॅकडाऊनमुळे फळांना हवी तेवढी किंमत मिळत नव्हती. आता बाजारपेठा हळू़हळू सुरु होतील वर्षभरातचं कसंतरी नियोजन करण्याची संधी होती मात्र या वादळाने तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, अशी हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.