मुंबई : येत्या ३१ मे ते ४ जून या दरम्यान अरबी समुद्राच्या मध्य आणि आग्नेयेकडच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वादळाची शक्यता असल्याने समुद्र खवळेला राहू शकतो. अशावेळी मासेमारी करणे धोक्याचे असून ते जीवावर बेतू शकते, त्यामुळे अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील हवामान विभागाबरोबरच पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाने दिला आहे.
त्यामुळे अरबी समुद्रात उद्भवणारी वादळी परिस्थितीची लक्षात घेता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे(एनडीआरएफ) राज्यात 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यापैकी मुंबई त 3 पालघर येथे 2, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी 1 तुकडी तैनात करण्यात आली आहे.