फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
पुणे(प्रतिनिधी) : राज्यातील हमाल, कामगार आदी कष्टकऱ्यांच्या हितासाठी माथाडी कामगार कायदा लागू करण्यात आला. मात्र, गेल्या सध्यस्थितीत या कायद्याचा दुरूपयोग वाढला आहे. राज्यातील उद्योजकांना कामगार संघटना आणि माथाडींच्या माध्यमातून खंडणी आणि कामगारांसाठी धमक्या येत आहेत. त्यामुळे व्यापारी व कारखानदार त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या या प्रकारातून उद्योजकांची सुटका करण्याची मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांकडे केली आहे.
याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठविले आहे. ज्याठिकाणी हमालांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे त्याच ठिकाणी माथाडी कामगार कायदा लागू करण्यात यावा. तो इंडस्ट्रीला लावू नये. ज्या ठिकाणी हमाल कामगारांचा गठ्ठा आहे अशा ठिकाणीच कायदा लागावा. संपूर्ण जिल्ह्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये स्थापन केलेले बोर्ड अस्तित्वात नाहीत. ज्याठिकाणी वनमॅन बोर्ड आहेत त्याचाही दुरुपयोग होत आहे. त्वरित बोर्ड अस्तित्वात यावेत व हमालांना योग्य कायदा मिळावा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.