मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे गेले दोन महिने बंद असलेले लाल परीची चाके पुन्हा धावू लागली आहेत. महानगरपालिका आणि कंटेन्मेंट झोन वगळता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ग्रामीण भागात एसटी बसची सेवा अखेर सुरु झाल्या आहेत. मात्र, दोन महिन्यांनी एसटी सुरु झाल्यानंतर त्याला राज्यभरातून अल्प प्रतिसाद मिळाला.
एसटी बसने प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने नियमावली जाहीर केली आहे. त्यात एका बसमध्ये फक्त 22 प्रवासी प्रवास करु शकतील. एका सीटवर फक्त एकच प्रवासी असेल, बस सॅनिटाइज केलेली असेल, तसेच प्रवाशांना सुद्धा आपले हात सॅनिटाइज करुनच तिकीट दिले जाणार आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे.
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारपासून एसटी बसेस धावू लागल्या आहेत. भंडारा जिल्ह्याच्या 4 ही आगारातून 41 शेड्युलचे आयोजन करण्यात आले होते. त्या पैकी 245 बसच्या फेऱ्या पूर्ण झाल्या. या फेऱ्यांनुसार काल शेवटच्या फेरीपर्यंत 1,358 लोकांनी प्रवास केला. आजपासून 3 दिवस सुट्ट्या पडल्यामुळे कालच्या तुलनेत आज प्रवासी संख्या कमी असल्यामुळे बस फेऱ्या कमी करण्यात आल्या.
सोलापूरमध्येही प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळला.
अक्कलकोट आगारात 15 मार्गांवर 46 फेऱ्या, तर करमाळा आगारात 70 फेऱ्या झाल्या आहेत. दुसरीकडक कुर्डुवाडी आगारात तीन ठिकाणी नियोजित केलेले बसेस प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्या.
अमरावतीत बडनेरा वगळता परतवाडा, दर्यापूर, चांदूर रेल्वे, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार या ठिकाणी निम्या एसटी वाहतूक सुरु झाली आहे. सहा आहारात 547 बस फेऱ्या झाल्या आहेत. तर 112 चालक वाहक नियुक्त करण्यात आले आहेत.