नवी दिल्ली – मालदीव येथे अडकलेल्या दोनशे भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस मगर हे जहाज आज मालेत पोहचले असल्याचे वृत्त आहे. याच वेळेला मालदीव मधून 698 भारतीयांना परत घेऊन येणारे आयएनएस जलसा हे नौदलाचे जहाज आज केरळात कोची बंदरावर पोहचले.
या जहाजांवर वैद्यकीय सुविधांसह प्रवाशांसाठी सर्व आवश्यक त्या सुविधा घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जगभरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 64 विमाने तैनात करण्याबरोबरच नौदलाचीही दोन जहाजे तैनात करण्यात आली आहेत.
या मिशनसाठी वंदे भारत मिशन असे नाव देण्यात आले असून या टप्प्यात 12 देशांतील नागरीकांना परत आणले जात आहे.