नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. अशात गृहमंत्रालयाने कोरोनासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे. देशात मुंबई, पुणे, जयपूर, इंदूर, कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना यासंबंधी एक पत्र लिहिले आहे. त्यात, लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका देखील वाढला आहे.
Union Home Secy Ajay Bhalla, in a letter dated 19 April 2020, has asked Chief Secretaries of all states/UTs drawing their attention to the guideline that state/UTs govts shall not dilute the guidelines under Disaster Mgmt Act, 2005 in any manner & shall strictly enforce the same. pic.twitter.com/gQehWI1XF0
— ANI (@ANI) April 20, 2020
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी सर्वांना मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असे सांगितले आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात हिंसाचार होत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याचसोबत काही शहरांमध्ये गाड्यांची रहदारी सुद्धा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड -१९ परिस्थितीचे आकलन करण्यासाठी सरकारने ६ आंतर-मंत्रालयीन केंद्रीय टीमची स्थापना केली आहे आणि राज्यांना आवश्यक सूचनादेखील गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. मंत्रालयाने असे देखील सांगितले की, ही टीम लॉकडाउनची अंमलबजावणी, आवश्यक सामग्रीची पूर्तता आणि पुरवठा तसंच आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षिततेवर भर देतील. देशात कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार २५६ वर पोहचला असून आतापर्यंत ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.