सातारा : जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान-मोठ्या प्रकल्पांसह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा.
उरमोडी प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा. या प्रकल्पाच्या माण-खटाव या भागातील ३१ किलोमीटर वितरण प्रणालीचे काम तत्काळ पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्याआधी कार्यारंभ आदेश देऊन प्रत्यक्ष काम सुरु करावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जयकुमार गोरे उपस्थित होते.