नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात असून निवडणूक प्रचारात नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलतांना भाजप सरकार खोचक टीका केली आहे.
#WATCH Delhi CM Arvind Kejriwal: Shaheen Bagh pe sabse zyada fayda is waqt BJP ko ho rha hai. Shaheen Bagh ke alawa unke paas pure chunav mein koi narrative nahi hai #DelhiElections pic.twitter.com/BaOH1RNyVL
— ANI (@ANI) February 5, 2020
अरविंद केजरीवाल म्हणाले,’शाहीनबाग संदर्भात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वात जास्त फायदा कुठल्या पक्षाला होत असेल तर तो पक्ष म्हणजे भाजप आहे. शाहीनबागच्या मुद्द्या व्यतिरिक्त भाजपकडे या निवडणुकांमध्ये बोलण्यासाठी कुठलाच मुद्दा नाही. मी शाहीनबाग बाबत कित्येकदा गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला मात्र त्याला प्रतिसाद देण्याऐवजी त्यांनी गलिच्छ राजकारण केले.
या निवडणुकीत मी दिल्लीच्या विकासावर प्रचार सभेत भर दिला माझ्या संकल्पना मांडल्या त्यावर चर्चा घडवणे अथवा ते खोदून काढणे भाजपने करणे अपेक्षित होते ते सोडून, विकासाचे राजकारण सोडून ते केवळ शाहीनबाग या विषयावरच बोलत आहेत.’ असं म्हणत केजरीवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.