नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले आहे. दरम्यान, न्यायालयात मराठा आरक्षणाचा निकाल काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Supreme Court says it will start from March 17 the final hearing of the petitions challenging the constitutional validity of a Maharashtra law that grants reservation to the Maratha community in education and jobs. pic.twitter.com/aZHNeJlDIz
— ANI (@ANI) February 5, 2020
मराठा आरक्षणास गुणरत्न सदावर्ते व इतरांच्या याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे आज सुनावणी झाली. यावेळी १७ मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यासोबत शबरीमला व अन्य प्रकरणांवर सुनावणी सुरू होणार असल्याने मराठा आरक्षणप्रकरणीची सुनावणी लांबणीवर गेली.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाकडून 58 मूकमोर्चे काढण्याच आले होते. त्यानंतर राज्य सरकारने नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर मुबंई उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठेवलं होतं. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षण देतेवेळी घटनापीठाने घालून दिलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचं याचिकेत म्हटले होते.