धुळे : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आतापर्यत ४०० पेक्षा जास्त जणांचा प्राण गेला आहे. वुहान प्रांतातून प्रत्येक नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु धुळ्याच्या दोन तरुणांनी वुहानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ते वुहानमध्येच राहणार आहे. या विद्यार्थ्यांना चीन सरकारतर्फे बॅटरीवर संशोधन करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. तंत्रीक अडचणीमुळे ते भारतात परंतु शकले नाहीत.
चीन सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात परत आलो असतो तर, आमचे शैक्षणिक नुकसान झाले असते, अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांकडे जीवनावश्यक वस्तू असून दोघेही सुरक्षित स्थळी आहेत. तसेच चीन सरकारने त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. संशोधन पूर्ण करून लवकर भारतात परत येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.