नवी दिल्ली : केंद्रीय वस्त्रोद्योग, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी फायदेशीर असून, मध्यमवर्गीयांसाठी हा अर्थ संकल्प दिवाळी असल्याचे म्हंटले आहे.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्मृती इराणी यांनी येथील संसद भवन संकुलात पत्रकारांशी संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या सबलीकरणाच्या दृष्टीने एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला आहे. मध्यमवर्गाला आयकर सूट देण्यात आली आहे.
मुलांच्या पोषण आहारासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महिला सबलीकरणासाठी 28600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही चंगली बाब आहे असे मंत्री म्हणाल्या.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. राहुल गांधींना अर्थसंकल्प म्हणजे काय? आणि त्यांना तो कितपत समजला यावर स्मृती इराणी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.