नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायदा सीएए आणि एनआरसी बद्दल देशाची दिशाभूल केल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी केला.
“सरकार देशात दडपशाही करीत आहे, समाजात द्वेष पसरवत आहे, “देशात अशांतता आहे. राज्यघटनेचा दरुपयोग केल्या जात असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.
”कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या या बैठकीला २० विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत सीएए विद्यापीठ परिसरातील हिंसाचार, आर्थिक मंदी, इतर अनेक विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए.के. माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी राजा, झामुमोचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, आरजेडीचे मनोज झा, नॅशनल कॉन्फरन्सचे हसीन मसूदी आणि आरएलडीचे अजित सिंग आदी नेते उपस्थित होते.