नवी दिल्ली : भारतीय तिन्ही सैन्य दलात समन्वय असणे आवश्यक असून त्यांच्या कृतीवर देशाची सुरक्षा अवलंबून असते. तसेच आमचे जवान आमची सर्वात मोठी ताकद आहे, भविष्यातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही सज्ज असल्याचे मत भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले होते.
Statements by Indian COAS to undertake military action across LOC are routine rhetoric for domestic audiences to get out of ongoing internal turmoil.
Pakistan Armed Forces are fully prepared to respond to any act of Indian aggression.— DG ISPR (@OfficialDGISPR) January 11, 2020
लष्करप्रमुखांच्या या विधानानंतर पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला असून पाकिस्तानने भारताला पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रवक्त्याच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘देशाच्या परिस्थितीवरून लक्ष हटविण्यासाठी भारतीय लष्कर प्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच पाकिस्तानी सेना भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’