मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याचा निषेध करण्यासाठी मुंबई येथून ‘गांधी यात्रा’ सुरू केली आहे. गांधी यात्रा मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून ते दिल्लीच्या राजघाटपर्यंत जाईल.
यशवंत सिन्हा यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा, कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण या बड्या नेत्यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हि यात्रा राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणामार्गे 30 जानेवारीला दिल्लीला पोहोचेल.
यशवंत सिन्हा यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना महात्मा गांधींचे स्मरण केले. ते म्हणाले की, आम्ही पुन्हा गांधींना मारू देणार नाही. गांधी यात्रेच्या माध्यमातून यशवंत सिन्हा यांच्यासह विरोधक शेतकर्यांचा प्रश्न, देशाच्या ढिसाळ अर्थव्यवस्थेसह सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित करणार आहेत.