नागपूर : खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडी सरकारच्या कर्जमाफीवर नाराजी वक्त केली आहे. ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.
या कर्जमाफीमुळे सात बारा कोरा करण्याचा शब्द पुर्ण होत नाही. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे थकीत असणा-या शेतकर्यांना थोडाफार लाभ मिळेल. पण महापूर , अतिवृष्टी यामुळे जे प्रचंड नुकसान झाले आहे
— Raju Shetti (@rajushetti) December 21, 2019
ते आश्वासन सरकाने पळाले नाही.थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडाफार फायदा या कर्जमाफीचा होईल. राजयात अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जून शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार कि नाही हे स्पष्ट नाही.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी करणार असल्याची घोषणा आज विधानसभेत केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे.