अनिल जोशी यांचे मत : शिरूरमध्ये ग्राहक जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम
शिरूर – सध्या जाहिरातीचे युग असून या जाहिरातींमधून नागरिकांना आकर्षित केले जाते आहे. ग्राहकांची गरज नसताना जाहिरात ग्राहकांची गरज निर्माण करते. यातूनच ग्राहक फक्त हसत असतो, त्यामुळे ज्याची आपल्याला गरज आहे. त्याकडे ग्राहकांनी जास्त प्रमाणात लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच महावितरण पुणे परिमंडळचे सदस्य अनिल जोशी यांनी व्यक्त केले. खोट्या जाहिराती करणाऱ्या अनेक कंपन्यांवर व त्यांच्या जाहिरातीवर शासनाने बंदी असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शिरूर येथे ग्राहक जनजागृती सप्ताहाचे आयोजन छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे फार्मसी कॉलेज, शिरूर येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरूर तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना अलमशाह मोमीन ग्राहक पंचायत, पुणे विभागीय सह संघटक यांनी अन्न भेसळ कशी ओळखावी. व उपाययोजना यासंबंधी मार्गदर्शन केले. अनिल जोशी यांनी ग्राहक संरक्षण कायदा व त्यातील तरतुदी, जाहिरातींचा भुलभुलैय्या, ग्राहकांनी जाहिरातींपासून कसे सावध राहावे, यासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे, नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव, सहायक निबंधक हर्षित तावरे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, उपअधीक्षक भूमीअभिलेख विनायक ठाकरे, शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, संतोष औटी, शिक्रापूरचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ राणगट, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. जी. बाहेती, ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे जिल्हाध्यक्ष अशोक भोरडे, ग्रा.पं. म. शिरूरचे तालुकाअध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, सहसंघटक अरुणकुमार मोटे, सचिव उद्धव जाधव, दत्तू किसन भुजबळ, आबा थोरात, संदीप शेळके, मच्छिंद्र झरेकर, काळूराम दोरगे, राहुल गवारी, नवनाथ भुजबळ उपस्थित होते. कॉलेजचे एनएनएसचे प्रकल्प अधिकारी प्रा. सचिन कोठावदे यांनी प्रास्ताविक केले.