नवी दिल्ली – राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांनी ११ रुपये आणि एक वीट द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. झारखंडमधील निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. यावेळी आदित्यनाथ यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला
योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले कि, मी उत्तर प्रदेशमधून आलो आहे. जी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. त्यांच्या शासन प्रणालीला रामराज्य म्हटले जायचे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला. तेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ५०० वर्षे जुना वाद संपुष्टात आला आहे. लवकरच अयोध्येत एका भव्य मंदिर उभे राहणार आहे. यासाठी झारखंडवासियांनी ११ रुपये आणि एक वीट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath at a public rally in Giridih: Every family in Jharkhand should contribute one brick and Rs 11 for the construction of Ram Temple in Ayodhya (UP). #Jharkhand (13.12.2019) pic.twitter.com/boaD4EPpa4
— ANI (@ANI) December 14, 2019
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यात येण्यासाठी एका समिती स्थापन करावी, असेही न्यायालायने सांगितले आहे.