दिलासा मिळणार : शासन स्तरावर हालचाली सुरू
पुणे – राज्यात जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमुळे अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत.
बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी उपसमिती स्थापन केली आहे. या उपसमितीने पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या खर्चाकरिता नवीन लेखाशीर्ष निर्माण केले आहे. या योजनेवरील खर्चासाठी राज्याचे सहकार आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.