पंतप्रधानाचा काँग्रेसवर हल्लबोल-
धनबाद – झारखंड विधानसभेच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकता दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसच्या राजकारणामुळे आसाममध्ये अराजकता निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला .
मोदी म्हणाले,पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानात अल्पसंख्याकावर अत्याचार होत आहेत. त्यांना राहण्यासाठी घर नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत अशा अल्पसंख्याकांना सहारा देणे भाजपाची प्राथमिकता आहे .
काँग्रेसच्या राजकारणामुळे समाजात दुही निर्माण होते आहे. काँग्रेस कधीही राष्ट्रहिताचा विचार करत नाही अशी टीका त्यांनी केली . काँग्रेस, जेएमएम, राजद यांच्यावर आसामच्या जनतेने विस्वास ठेऊ नये असे आवाहन मोदी यांनी केले .