पुणे – शेतकऱ्याचे पैसे थकीत असलेल्या राज्यातील 20 कारखान्यांना यंदा गळीत हंगामासाठी परवानगी देण्यात आली नाही. पहिले थकीत पैसे भरा नंतरच परवाना मिळेल, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
राज्यात गळीत हंगाम सुरू झाला आहे. पाऊस आणि निवडणुका यामुळे यंदा उशिराने हंगाम सुरू होत आहे. त्याचबरोबर यंदा कालावाधीही कमी राहणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र हाच उसाचा पट्टा समजला जातो. मात्र, येथे आलेल्या पुरामुळे उसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच यंदा ऊस कमी आहे. त्यामुळेच यंदा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. हंगाम सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी ऊसच उपलब्ध नसल्याने कारखाने शांत आहेत. अनेकांनी परवाने घेतले असले तरी गाळप सुरू केलेले नाही.