श्रीगोंदा – तालुक्यातील अजनुज, आर्वी व पेडगाव या भीमा नदी पट्ट्यात अवैध वाळू तस्करीविरुद्ध कारवाई करीत महसूल विभागाने वाळूउपसा करणाऱ्या 8 बोटी नष्ट करीत अंदाजे 40 लाखाचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
मंगळवारी (दि. 6) अजनुज, आर्वी, पेडगाव या परिसरात बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने एकूण 8 बोटी नष्ट केल्या आहेत. या पथकात पेडगाव मंडळ अधिकारी आजबे, मंडळ अधिकारी प्रशांत सोनवणे, लिपिक सतीश घोडेकर, पोलिस कॉन्स्टेबल दादा टाके, पोलीस कॉन्स्टेबल उत्तम राऊत, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल किरण बोराडे हे कर्मचारी होते.