नांदेड: काश्मीरातील नागरीकांवर घालण्यात आलेल्या विविध प्रकारच्या निर्बांमुळे गेले 22 दिवस सासु सासऱ्यांशी संपर्क साधता आलेला नाही असे अभिनेत्री व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.
आज पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की आमचे सासु सासरे काश्मीरात राहतात. ते मधुमेहाचे रूग्ण आहेत आणि त्यांना उच्च रक्तदाबही आहे. तथापी तेथील फोन बंदीमुळे आम्हाला त्यांची खुशालीच कळलेली नाही. त्यांच्याकडे पुरेसा औषध साठा आहे की नाही हेही समजलेले नाहीं असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या एकूणच स्थिती विषयी प्रतिक्रीया देताना त्यांनी म्हटले आहे की हा केवळ कलम 370 रद्द करण्याचा विषय नाही, तर ज्या अमानवीय पद्धतीने हे सारे करण्यात आले आहे त्याच्या विषयी आम्हाला चिंता आहे. आम्ही पतीपत्नी गेले अनेक दिवस त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत पण आमचा संपर्कच अजून होऊ शकलेला नाही असेही त्यांनी नमूद केले.