रेडा – पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दानांवर मुख्यमंत्र्यांचे फोटो हा असंवेदनशीलपणाचा अतिरेक आहे, अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या व पूरग्रस्त परिस्थितीची व दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार सुळे आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील महापूर ओसरल्यानंतर सत्ताधारी गटावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चौफेर टीका सुरू केल्यामुळे भाजप नेते बॅकफूटवर गेले आहेत.
खासदार सुळे म्हणाल्या की, चांगलं काम करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. राज्यात पुरामुळे हाहाकार माजवला असताना मुख्यमंत्री हे त्या पूरग्रस्तांना मदत देत असलेल्या धान्यवर आपला फोटो टाकून फक्त पब्लिसिटीचा स्टंट करीत आहेत. ही जगातली पहिल्यांदाच अशी घटना घडत आहे. हा सरकारचा असंवेदनशीलपणाचा अतिरेक आहे. इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहपूर येथील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाकडे नीरा व भीमा नदीवरील सर्व गावांचे तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे तसेच, पशुधन, घरे, दुकानांचे नुकसान झालेले आहे. त्या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिल्या. यावेळी इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, माजी सरपंच गौरव दंडवते, नीरा नरसिंहपूर पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
Nalayk panacha Kahi limit aaste bai…