सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी पाठविल्या 10 बोटी
सातारा : सांगली येथे पुरपरिस्थितीची बिकट असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सांगलीसाठी 10 बोट पाठविण्यात आल्या असून आणखीन 5 बोटी पाठविण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात असलेली एनडीआरएफची टीम सुद्धा सांगलीला पाठविण्यात आलेली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडून आणखी मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार , अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिली.
एनडीआरएफची टीम गुजरातहून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आली होती त्यांचे वाहन बोरगाव पोलीस स्टेशन येथे बंद पडले. त्यांना एसटी बसची सुविधा उपलब्ध करुन आपत्ती व्यवस्थापनासाठी जाणाऱ्या सर्व गाड्यांना जिल्हा प्रशासनाने व पोलीस विभागाने सातारा जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग निर्माण करुन दिला आहे.
पुरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती, दरड कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे, घर पडणे इत्यादी कारणांमुळे सातारा जिल्ह्यातील 1 हजार 638 कुटुंबातील 7 हजार 85 नागरिकांची जिल्हा प्रशासने तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे. या पुरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा तसेच त्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आली आहे. या पुरग्रस्तांना जिल्हावासीयांनी मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
ही मदत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. नागरिकांनी ब्लॅकेंट, धान्य, बिस्कीटे यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत करावी तसेच धनादेश देऊन मदत करावयाची असल्यास धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (पूर) या नावाने द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे. या मदतीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांनी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे, त्यांचा मोबाई क्र. 98604146186 तर दूध्वनी क्रमांक 02162-234840 असा असून कुणालाही पुरग्रस्तांना मदत करावयाची असल्यास त्यांनी या मोबालईल क्रमांकावर किंवा दूरध्वनीसंपर्क साधावा. पुर ओसारताच रोगराई पसरण्याची शक्यता असते ही रोगराई पसरु नये म्हणून आरोग्य विभागाची पथके कार्यान्वीत करण्यात आली आहेत. तसेच पुरग्रस्त भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पिण्याचा टँकर उपलब्ध करुन देणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
पुरग्रस्तांना मतदीचा हात
जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आर्ट ऑफ लिव्हींग, किराणा रिटेल असोसिएशन सातारा, कॉम्प्युटर व मीडिया डिलर असोसिएशन, सातारा यांच्यामार्फत अन्नधान्य व साहित्यांचे वितरण करण्यात आले. तसेच पाटण येथील पुरग्रस्तांसाठी तांदूळ, डाळ, बिस्कीटे, पाणी, कपडे इत्यादी साहित्य पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती नाव न सांगताही पुरग्रस्तांना मदत करीत आहेत. ब्लॅकेंट, धान्य, बिस्कीटे यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत करावी, असे आवानही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.