मुंबई : कॉंग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि तिकडे नेटकऱ्यांना चांगलाच विषय मिळाला. राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर सिद्धुंची जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांनी तर सिद्धूंना द कपिल शर्मा शोमध्ये परतण्याचा सल्लाच दिला आहे. इतकंच नव्हे तर काहींनी द कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एकदा स्वागत असेच म्हटले आहे.
Back to Kapil Sharma Show !
— Sameer Kishore ? (@nationalist_Eye) July 14, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूंनी पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी टीकेचा भडीमार करत कपिल शर्मा शोमधून सिद्धूंना हाकला अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना शोमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांच्या जागी सध्या अर्चना पुरण सिंग शोमध्ये आहेत. त्यामुळे आता अर्चनाच्या जागी पुन्हा सिद्धू येणार का हे पाहणे गरजेचे आहे.