चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे असा आग्रह केला आहे.
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे संकट कमी होईल. देशातील बहुतांश शेतकरी कर्जात अडकले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे दुर्दैवी पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंत कर्जमाफ केले आहे. यात केंद्र सरकारच्या सहकार्याची गरज आहे.
पंतप्रधान कृषी योजनेअंतर्गत जी कृषी पेन्शन योजना केली आहे ती अपुरी आहे. पंतप्रधान पीक विमा योजना पूर्वीपेक्षा चांगली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. ही योजना शेत किंवा भूखंडावर आधारित नसावी. ही योजना शेतकऱ्याने आधी कुठले पीक घेतले आहे त्यावर आधारित असावी. तसेच कापणीनंतर पिकाला बाजारात भाव मिळत नाही. विमा योजनेत हा मुद्दाही असावा. तसेच कृषी विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तींचाही समावेश असावा. रब्बी पिकांमध्ये अवकाळी पाऊस आणि खरीप पिकांमध्ये कमी पावसाचा समावेश योजनेत करावा असे सिंग यांनी म्हटले आहे.