1994 साली सुष्मिता “मिस युनिव्हर्स’ बनली तर ऐश्वर्या “मिस वर्ल्ड’ बनली होती. मात्र या दोघींमध्ये पहिल्यापासून काही सख्य नव्हते. एकप्रकारची स्पर्धा आणि “कोल्ड वॉर’च होते, असे म्हटले जायचे. त्याचे कारण म्हणजे सुष्मितापेक्षा ऐश्वर्याला फॅशन आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात ब्रॅन्ड ऍम्बेसेडर म्हणून अनेक कंपन्यांनी जास्त पसंती दिली होती. त्याशिवाय बॉलिवूडमध्येही ऐश्वर्याच्या सौंदर्याचा प्रचंड दबदबा निर्माण झाला होता.
या दोघीमधील या अंतर्गत स्पर्धेबाबत सुष्मिताने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यामध्ये एक शीतयुद्ध होते, असे म्हटले जात असले तरी त्यामध्ये तथ्य नाही. ऐश्वर्याबाबत आपल्या मनात नेहमीचे सॉफ्टनेस राहिला आहे. दोघी मैत्रिणी आहेत, असे म्हणता येणार नाही. पण दोघींमधील नाते निश्चितच मैत्रीपूर्ण आहे, असे सुष्मिता म्हणाली.
कामाच्या बाबतीत बोलायचे तर सुष्मिता बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिली आहे. अलिकडच्या काळात सोशल मिडीयावर पोस्ट केलेले फोटो आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलबरोबरच्या अफेरमुळे सुष्मिता चर्चेत आली होती. सुष्मिताचा भाऊ राजीव सेनचे लवकरच लग्न होणार आहे. पण अजून सुष्मिताच्या लग्नाचा पत्ता नाही.