कोल्हापूर: मतमोजणीला काही तास असतानाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात भाजपा – शिवसेनेच्या 44 जागा येणार असल्यावर ठाम आहेत. केंद्रात 290 राज्यात 44 तर पश्चिम महाराष्ट्रात 10 जागा युतीला मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
युतीचा विजय निश्चित असला तरी राज्यातील दुष्काळी वातावरण पाहता विजयाचा जल्लोष साधेपणाने करण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.दरम्यान ईव्हीएम बद्दल विरोधक विनाकारण शंका उपस्थित करत असल्याची टीका त्यांनी केलीय. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री निवडण्यासाठी सर्व अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.