मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक देशात त्रिशंकू सरकारचीच परिस्थिती राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एक्झिट पोल बदल प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही. देशात त्रिशंकू सरकारचीच परिस्थिती राहील.तसेच महाराष्ट्रात आघाडी २० ते ३० जागेवर विजयी होईल हा आमचा अनुमान आहे, असं देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.