पुणे – बहुचर्चित भामा आसखेड धरणातून पुण्यात पाणी आणण्याच्या कामास सीआरपीएफ पथकासह प्रचंड पोलिस बंदोबस्तात आज सकाळी सुरू करण्यात आले. परंतु, पोलिसांचा दडपशाहीचा ससेमिरा चुकवत धरणग्रस्त जागोजाग जमत शासनाचा तीव्र निषेध नोंदवत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून चाकण पोलीस स्टेशन परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलक आक्रमक होवू नये यासाठी मध्यरात्री १ वाजता प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांचे मोबाइल जप्त केले होते.