कोल्हापूर: मुंबई-पुण्याचं गाड्या जाळण्याचं लोण आता कोल्हापूर पर्यंत येऊन पोहोचल आहे. कोल्हापुरात एका रात्रीत ६ दुचाकी गाड्या जाळण्याच्या प्रकार घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाड्या जळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
कोल्हापूर शहरात रमणमळा नावाचा परिसरात आहे. या परिसरात अनेक कुठूम्ब राहायला आहेत. नेहमी प्रमाणे सोनवणे कुठुमबीय आपल्या दुचाकी घरा समोरील रस्त्यावर पार्किंग केल्या होत्या. मध्यरात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारस अज्ञात व्यक्तींनी रमणमळा परिसरात लावलेल्या ६ दुचाकी पेटवून दिल्या. यामध्ये ६ दुचाकी पूर्ण जळाल्या आहेत. यात सुमारे २ लाखांचे नुकसान झालं असल्याचं प्राथमिक अंदाज आहेत. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना कळाल्यावर शाहूपुरी चे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून गाड्या जाळणाऱ्या अज्ञाता व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. अज्ञातांच्या या कृत्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.