पुणे – नववर्षारंभातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा शनिवारी साजरा होत आहे.यानिमित्ताने उभारण्यात येणारी गुढी शक्यतो सुर्योद्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत उभारावी, असे आवाहन तेजस सप्तर्षी गुरुजी यांनी केले आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढी पाडव्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षांरंभ असतो. त्यामुळे या दिवशी घरा घरामधून गुढी उभारली जाते. या गुढीला साखरेची गाठी तसेच सुंदर वस्त्र, तांब्यांचा लोटा असे बांधून ती उभारली जाते. शनिवारी सकाळी शक्यतो दहा वाजायच्या आत गुढी उभारण्यात यावी, तसेच सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळेला ही गुढी पुन्हा उतरवून ठेवावी. या गुढीला बांधण्यात आलेली साखरेची गाठी ही लहान मुलांच्या गळ्यात सुद्धा घातली जाते, असेही सप्तर्षी गुरुजी यांनी सांगितले. यादिवशी गुढीचे दर्शन तर घ्यावेच त्याचबरोबर घराजवळील विविध मंदिरांमध्ये जावून सुद्धा दर्शन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.