तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – येथील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये “माझी वसुंधरा ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४” प्रचार व प्रसिद्धीसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात नगरपरिषदेतर्फे ७० विजेत्यांना मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी कर विभाग प्रमुख कल्याणी लाडे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, स्वच्छ भारत अभियानच्या शहर समन्वयक गीतांजली होनमने आदी उपस्थित होते. या वेळी सर्व विजेत्यांना मानचिन्ह व मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेमध्ये एकूण ३०२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियान यांचे मूळ उद्देश्य रुजावेत व विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जागृत राहावे हा उद्देश्य समोर ठेवूनच सदर कार्यक्रम आयोजित केले जातात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वच्छ भारत अभियानच्या शहर समन्वयक गीतांजली होनमने यांनी केले.