Chhagan Bhujbal On Raj Thackeray| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी सोमवारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या महायुती च्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे जोर धरला आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
“राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. कोणाची ताकद किती आहे हे मला माहिती नाही. कोणाला तरी बरोबर घायाचे आहे तर जागा द्याव्या लागतील. पण राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे.” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे
“शिवसेना आणि भाजप या दोन्हींचा विचार हिंदुत्वाचा आहे. आमचा पक्ष त्यांच्या युतीत आहे. भाजपमध्ये विलीन झालो नाही, त्यांच्या पक्षात आम्ही आमचा पक्ष विलीन केलेला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावरच आम्ही चालत आहोत. लोकांना या सगळ्याची जाणीव आहे. कोण काय भाष्य करतं याकडे लोक पाहात नाहीत, कोण आपली कामं करतो ते लोक पाहतात. आमचा म्हणजे महायुतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नक्की आहे. आम्ही महायुती म्हणून मोदींसाठी काम करतो आहोत.काही ठिकाणी निवडणुकांसाठी खूप वेळ आहे. मोदी साहेबांना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे. त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील. ” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
आधी जाहिरातबंदी, आता न्यायालयाचा अवमान; बाबा रामदेव अडचणीत कसे सापडले?