Sanju Samson’s Statement Regarding Rohit Sharma : भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या संजू सॅमसनला वारंवार भारतीय क्रिकेट संघातून वगळले जाते आणि नंतर त्याला संधीही मिळत नाही. 2015 मध्ये त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, पण पुढचा सामना खेळण्यासाठी त्याला पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
त्याच वेळी, त्याचे वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण 2021 मध्ये झाले होते आणि 2023 च्या विश्वचषकापर्यंत त्याची वनडे फॉरमॅटमधील कामगिरी चांगली होती, परंतु तरीही त्याला टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकले नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू झालेल्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसनच्या नावाचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मानं कशी साथ (सपोर्ट) दिली याचा खुलासा संजू सॅमसन यानं केला आहे.
रोहितने केलं संजूचे समर्थन…
धान्या वर्माच्या यूट्यूब चॅनलवर रोहित शर्माकडून करिअरमध्ये मिळालेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, रोहित शर्मा हा पहिला व्यक्ती होता, ज्यानं माझ्याकडे येऊन बातचीत केली. तो मला म्हणाला की, “हाय संजू, तू कसा आहेस. तू आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलीस, पण तू मुंबई इंडियन्सविरुद्ध खूप षटकार मारलेस. तू खरोखरच चांगली फलंदाजी केलीस. त्याने खरच मला खूप सपोर्ट केला आहे.”
Rohit Sharma was the only cricketer who came forward in support of Sanju Samson during his rough patch
Captain Leader Legend Hitman🫡 pic.twitter.com/3owtdzk263
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) November 24, 2023
याशिवाय संजूने त्याच्या मुलाखतीत असेही सांगितले की, “लोक त्याला खूप दुर्दैवी क्रिकेटर म्हणतात, पण मी दुर्दैवी नाही. मी क्रिकेटमध्ये आज जिथे आहे तिथे पोहोचण्याचा मी कधीही विचारही केला नव्हता.”
Mitchell Marsh : विश्वचषक ट्रॉफी वादात अडकला मिशेल मार्श; अडचणीत वाढ होण्याची शक्यता…
संजूचे आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल रेकॉर्ड…
संजूने त्याच्या आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीत 24 सामने खेळले आहेत आणि 374 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 12 डावांमध्ये 55.71 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. जर आपण त्याच्या आयपीएलमधील कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत एकूण 152 सामने खेळले आहेत आणि 3,888 धावा केल्या आहेत. या काळात त्याने अनेक वेळा मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तो राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपदही सांभाळत आहे आणि त्याने आपल्या संघाला आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये नेले होते.