Bachhu kadu : राज्यात मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वाघनखांवरून राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सरकारमधील मित्रपक्ष असणारे प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुनगंटीवार हे इंग्लडवरून वाघनखं न घेता परत आले त्यावरून बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी, “सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला होता. तसेच ५०-६० लाख रुपये खर्च करून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)इंग्लंडला गेले आणि मोकळ्या हाताने परतले, ही बाब मला आवडली नाही, अशी जाहीर नाराजी त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या इंग्लंड दौऱ्यावर भाष्य करताना बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी, “सुधीर मुनगंटीवार हे वाघनखं न घेताच परत येत आहेत. ते ५०-६० लाख रुपये खर्च करून तिथे गेले. हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तीश: जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात. सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत.” असा खोचक टोला यावेळी लगावला.
तसेच “सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी जाण्या-येण्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च करावा, हे मला काही आवडलं नाही. त्यांनी वाघनखं आणली असती, तर चांगली गोष्ट होती. दोन-तीन वर्षांसाठी वाघनखं उसणे आणणे, ही त्यांच्या डोक्यातील कल्पनाही चांगली आहे. मला वाटतंय आम्हीही तुमच्याबरोबर येतो, आपण वाघनखं लुटूनच आणू”, असा मिश्किल टोलादेखील त्यांनी(Bachhu kadu) लगावला.