नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या मंगळवारी चौथ्या दिवशी, विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूर मुद्द्यावर चर्चेसाठी नोटीसा दिल्या आहेत. लोकसभेत कॉंग्रेस खासदार मनीष तिवारी आणि गौरव गोगोई यांनी मणिपूर परिस्थितीवर चर्चेची मागणी करणारी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली आहे.
केशव राव, केआर सुरेश रेड्डी, जोगिनीपल्ली संतोष कुमार, बदुगुला लिंगय्या यादव, रंजीत रंजन, मनोज झा, सय्यद नसीर हुसेन, तिरुची शिवा, इम्रान प्रतापगडी यांनी माणपूरमधील प्रचलित परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी करणाऱ्या नोटीसा दिल्या आहेत. मोदींनी संसदेत हजर राहून मणिपुरवर निवेदन करावे या मागणीसाठी विरोधकांनी कालही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केल्याने कामकाज तहकुब करावे लागले होते. मात्र पंतप्रधानांकडून संसदेत यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.