पुणे – गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपल्या लावणी नृत्याने तीने अनेकांना भूरळ घातली असून तीचे लाखो चाहते बनले आहे. तीच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठा समुदाय असतो. सुरूवातीला ‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाही’ या लावणीवरील अश्लील नृत्यामुळे ती चर्चेत आली. त्यावरून सोशल मीडियावर बरेच मतप्रवाह पाहायला मिळाले. त्यानंतर ती कायम चर्चेत राहिली आहे.
दरम्यान, गौतमी आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे तीच्या नावासमोरील पाटील हे आडनाव वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
तर पाटील नावाच्या आडनावावरून नुकतीच पुण्यात एक बैठक पार पडली असून गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आलाय. तीचे आडनाव चाबुकस्वार असल्याचे सांगितले जातेय. ती पाटील आडनाव लावून पाटलांची बदनामी करतेय. तीने हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता यावर गौतमीची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ज्या-ज्यावेळी गौतमीवरून कोणताही वाद निर्माण झाला त्यावेळी तीने समाजमाध्यमांना प्रतिक्रिया देत तीची बाजू मांडली आहे. आता या विषयावर ती काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.
गौतमी पाटीलचा गुरुवारी सांयकाळी सात वाजता विरारमध्ये एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर ती या सगळ्या वादावर माध्यमांशी बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गौतमीच्या प्रतिक्रियेनंतर हा वाद आणखी चिघळणार की याला नवं वळण मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.