भवानीनगर : यंदाच्या वर्षी तापमानाने उच्चांक गाठला असून कडक उन्हे असह्य होत असल्याने तरुण मुले विहिरीचा आधार घेऊन विहिरीच्या पाण्यात पोहत असल्याचे भवानीनगर परिसरामध्ये चित्र दिसत आहे.
दरवर्षीच उन्हाळा येत असतो; परंतु या वर्षीचा उन्हाळा तीव्र असल्याने नागरिकांना सकाळी दहापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा सामना करावा लागत आहे. या उन्हामध्ये नागरिकांच्या जीवाची लाही होत असून उन्हापासून बचाव करण्यासाठी तरुण मुले विहिरीचा आधार घेत आहेत. ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विहिरी आहेत तेथे जाऊन ही मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत. याचबरोबर ज्येष्ठ आणि इतर नागरिकही एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीचा आधार घेऊन किंवा ज्या ठिकाणी शरीराला हवा लागेल अशा ठिकाणी मंदिराचा आधार घेताना दिसत आहेत.
या कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण होत आहे. त्वचेचेचा विकार देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, कितीही उन्हात जाण्याचे टाळले तरी नागरिकांना दैनंदिन कामासांठी घराबाहेर पडावेच लागत आहे आणि या उन्हाचा सामना करावाच लागत आहे. परंतु यातही वेळात वेळ काढून किंवा दुपारच्या वेळेस काही तरुण मुलांबरोबर नागरिक देखील उन्हापासून बचाव करण्यासाठी विहिरींमध्ये जाऊन पोहण्याचा आनंद घेत आहेत.
यंदाचा उन्हाळा अतिशय कडक असल्याने उन्हाळ्याच्या झळा नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दैनंदिन जी काही कामे असतील ती सकाळ आणि सायंकाळी च्या सत्रात करावीत व जास्तीत जास्त पाणी प्यावे यामुळे पुन्हा पासून नागरिकांचा बचाव होऊ शकतो व उन्हापासून होणाऱ्या आजारांपासून देखील बचाव होऊ शकतो. यामुळे यावर्षीचा उन्हाळ्याचा सामना करायचा असेल तर नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे व शक्यतो उन्हाळ्यात भर दुपारी घरी राहून जी काही दैनंदिन कामे करता येईल ते करावीत तरच यंदाच्या कडक उन्हाचा सामना नागरिक करू शकतील.
– डॉ. संग्राम देवकाते, भवानीनगर (ता. इंदापूर)