मुंबईः आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण सीबीआयने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार केले असून यात त्यांच्यावर शाहरुख खानच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे.
काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली होती.त्यानंतर समीर वानखेडे यांची तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली. दरम्यान या चौकशीत सीबीआयच्या काही प्रश्नांची उत्तर वानखेडे देऊ शकले नसल्याचे दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
समीर वानखेडे यांनी आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख कुटुंबीयांकडे २५ कोटींची मागणी केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये १८ कोटींचा सौदा झाला होता. यातील ५० लाख या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या किरण गोसावी याने अगोदरच घेतले होते. हे पैसे गोसावीने वानखेडे यांच्याच सांगण्यावरून घेतले असल्याचेही आरोपपत्रात म्हटले गेले आहे.
त्यासोबतच वानखेडे यांची चौकशी नुकतीच झाली त्यावेळी सीबीआयला सहकार्य केले मात्र काही प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकले नाहीत. वानखेडे यांच्याकडे असणाऱ्या महागड्या गाड्या आणि परदेश दौऱ्याची योग्य आणि समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नसल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे. दरम्यान,