मुंबई – वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यात आदिवासी मेळाव्याचं आयोजन केले होती. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. या कार्यक्रमात उपस्थित जनतेला उद्धेशून ते म्हणाले, ‘कमळावाले आणि अर्धी चड्डीवाले जर मतदान मागायला आले तर त्यांना मतदान करू नका.., ते तुम्हाला दारू देतील.., मस्तपैकी प्यायची.., कोंबड्या दिल्या तर मस्तपैकी खायच्या..,महात्मा गांधी आपल्याकडे पाठवले तरी घ्यायचे पण मतदान कमळाला? नाही करायचं.’
ते पुढे म्हणाले,’लोकशाही वाचली पाहिजे. ही लोकशाही वाचवायची असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका. पण त्याला मतदान करू नका.’ असं आवाहन त्यांनी केलं. अर्धी चड्डीवाल्यांचं आदिवासीस संपला पाहिजे असं धोरण आहे, कारण आदिवासींच्या संस्कृतीशी पटत नाही.
म्हणून आदिवासीस संपला पाहिजे असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे माझी आदिवासींना विनंती आहे की, अर्धी चड्डी, फूल चड्डीवाल्यांपासून सावध राहा आणि त्यांच्या विरोधात उभे रहा, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं.