मुंबई – शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेताहेत. शिवसैनिकांशी संवाद साधताहेत. अशात औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
Maharashtra | Stones were pelted at the convoy of Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Aaditya Thackeray in Aurangabd’s Vaijapur area during party’s Shiv Sanvaad Yatra. pic.twitter.com/QVHefWf9IU
— ANI (@ANI) February 8, 2023
शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येऊ नये यासाठी हे कारस्थान केलं जात असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे सभा स्थळावरून निघत असताना त्यांच्या गाडीवर काही जणांनी दगड फिरकावले. तसेच यावेळी जमावाने लोकल आमदार रमेश बोरनारे यांच्या नावाने घोषणा दिल्या जमावाकडून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
@AUThackeray साहेब यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला. सरकारचे देखील आदित्यजी ठाकरे साहेबांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/zUeFj8Bu6j
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 7, 2023
औरंगाबामधील महालगावातमध्ये शिवसंवाद यात्रा सुरु होती त्यावेळी त्याच ठिकाणी माता रमाई यांची जयंती असल्यामुळे मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी हा प्रकार घडल्याचे समोर आले. सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.