जम्मू – जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काश्मिरी पंडितांच्या संघटनेने केला आहे. पनुन काश्मीर या काश्मीरी संघटनेचे प्रमुख अजय चरूंगू यांनी म्हटले आहे की, आम्ही हे निःसंदिग्धपणे सांगतो की भारत सरकार दहशतवादाचा पराभव करण्यात पुर्ण अयशस्वी ठरले आहे कारण त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झालेल्या युद्धाचे धार्मिक स्वरूप न ओळखण्याचे जाणीवपूर्वक धोरण अवलंबले आहे.
Republic Day 2023 : प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी 9.15 वाजता होणार शासकीय ध्वजारोहण
1-2 जानेवारी रोजी राजौरीतील धनगरी गावावर झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यात सात जण ठार झाल्याची घटना घडली आहे त्याचाही दाखला त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की काश्मीर तसेच जम्मूमधील दहशतवादी हिंसाचाराचे पहिले लक्ष्य येथील अल्पसंख्याक आहेत, हा धोका भारत सरकारने ओळखायला हवा होता, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्षच करण्याचे काम केले आहे.
काश्मीर खोऱ्यातील हिंदु सरकारी कर्मचारी दहशतीच्या छायेत आहेत म्हणून त्या कर्मचाऱ्यांची जम्मू विभागात बदली करावी अशी आमची एकमुखी मागणी आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. जसजशी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील तसतसे जम्मू आणि काश्मीरमध्ये सॉफ्ट टार्गेट्सची असुरक्षितता प्रचंड वाढेल, आणि काश्मीरी पंडितांवर अधिक प्रमाणात हल्ले होंतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपने काश्मीरी पंडितांच्या स्थितीवरून अनेक वर्ष रान पेटवले होते पण आता या समाजानेच भाजपकडून आमचा फक्त राजकीय वापर होत असल्याचा आरोप केला आहे.