नवी दिल्ली – विणकरांना जीआय टॅग देण्यासाठी आणि मुक्त व्यापार करारामध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील असे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
नवी दिल्ली येथे विरासत या हाताने विणलेल्या साड्यांच्या महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या. हाताने विणलेल्या साड्यांचे पारंपारिक महत्त्व आणि या उत्कृष्ट साड्या बनवणाऱ्या विणकरांची माहिती देण्यासाठी टच स्क्रीन डिस्प्ले लावण्यात आल्याबद्दल सीतारामन यांनी कौतुक केले.
हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग वारसा प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून हातमाग साडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतात हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक सहभागी आहेत. हातमाग साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत. प्रत्येक प्रदेशात उत्कृष्ट साड्यांचे प्रकार आहेत. पैठणी, कोटपड, कोटा डोरिया, तांगेल , पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुबुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनचोई, भागलपुरी सिल्क, बावनबुटी आणि पश्मीना इत्यादी साड्यांचे प्रकार वैशिष्ट्यपूर्ण कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक नक्षीने जगभरातील ग्राहकांना आकर्षित करतात.